मुंबई: केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी आज राज ठाकरे यांना कठोर शब्दात इशारा दिला आहे. ठाकरे यांनी आरक्षणाच्या विरोधात घेतलेली भूमिका बदलावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
आठवले म्हणाले, "राज ठाकरे यांनी आरक्षणाची गरज नाही असे केलेले विधान मागे घ्यावे. त्यांच्या आरक्षण विरोधी भूमिकेचा विरोध करणे अत्यंत आवश्यक आहे. जर ठाकरे यांनी त्यांच्या आरक्षण विरोधी भूमिकेवर कायम ठाम राहिले, तर विधानसभा निवडणुकीत त्यांच्या मनसेच्या उमेदवारांवर दलित, आदिवासी, ओबीसी आणि बहुजन समाजाने बहिष्कार घालावा."
आठवले यांच्या या आवाहनामुळे राज ठाकरे यांना आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या दबावाचा सामना करावा लागू शकतो, असं मानलं जातं आहे.
Commentaires