top of page

राज्यात दुष्काळ पडलेला असतानाही फडणवीस जपानला गेले:उद्धव ठाकरे

फडणवीस तुमच्यासारखं सुट्टी एन्जॉय करण्यासाठी जपानला गेले नव्हते:भाजप

आज उद्धव ठाकरेंनी शिंदे गट आणि भाजपावर निशाणा साधला आहे. तसंच, मिश्कील शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही टीका केली आहे.ठाकरे म्हणाले फडणवीस जपानला गेले होते. चांगली गोष्ट आहे की कोणालातरी वाटलं की राज्यात उद्योगधंदे आले पाहिजे. इकडे दुष्काळ पडलेला असतानाही जपानला गेले, तिकडे डॉक्टरेट घेतली. तुमचा हा प्रयत्न स्तु्त्य आहे. कलंक, फडतूस वगैरे बोलणार नाही. पण महाविकास आघाडीच्या काळात जे उद्योगधंदे राज्यात आले होते, जे उद्योग राज्याच्या उंबरठ्यावर होते, ते तुमच्या डोळ्यांदेखत राज्याच्या बाहेर गेले अशी टीका ठाकरेंनी केली. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत म्हणाले

जे सत्तेत असताना अडीच वर्षे घरात बसून होते, ज्यांनी करोना काळात महाराष्ट्राला वाऱ्यावर सोडलं, जे १५ दिवस परदेश दौऱ्यावर जाऊन सुट्टी एन्जॉय करून आले ते देवेंद्रजी यांच्या जपान दौऱ्यावर टीका करत आहेत. देवेंद्रजींचा जपान दौरा तुमच्यासारखा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी नव्हता तर राज्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी होता.उद्धव जी एक लक्षात घ्या, तुम्ही आता विवेकभ्रष्ट, नितीभ्रष्ट झाला आहात.

Comentarios


bottom of page