top of page

फडणवीस यांच्या 'व्होट जिहाद' वक्तव्यावर टीका, संविधानाचा अपमान आणि शपथभंग असल्याचा आरोप


1 ऑक्टोबर 2024

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या 'व्होट जिहाद' या वक्तव्यावर मोठी टीका होत आहे. फडणवीस हे संविधानिक पदावर आहेत, आणि त्यांच्या या विधानामुळे भारतीय संविधानाच्या भावना आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या मताधिकाराच्या अधिकाराचा अवमान केल्याचा आरोप केला जात आहे. विरोधकांनी त्यांच्या वक्तव्याला संविधानाचा अनादर आणि संविधानाद्वारे घेतलेल्या शपथेचा भंग म्हणून पाहिले आहे.

विरोधकांनी उपस्थित केलेला मुद्दा असा आहे की, फडणवीस आणि भाजप नेत्यांनी मुस्लिम समाज भाजपाला मतदान का करत नाही, याचा विचार केला पाहिजे. भाजपाच्या मूळ विचारधारेत सर्वधर्मसमभाव आणि गांधीवाद आहे, परंतु सध्याच्या राजकारणात या तत्त्वांना विसरले जात आहे, असे विरोधकांचे म्हणणे आहे.

जम्मू आणि काश्मीरमध्ये मुस्लिम सणांना दोन सिलिंडर मोफत देणाऱ्या भाजपाची महाराष्ट्रातील भूमिका मात्र मुस्लिम समाजाला लक्ष्य करण्याची असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. नितेश राणे आणि रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यांना समर्थन देऊन भाजप मुस्लिमांबद्दल द्वेष पसरवतो, असे विरोधकांचे म्हणणे आहे. मुस्लिम समाजाला आकर्षित करण्यासाठी भाजपने त्यांच्याविरोधातील विद्वेषाला प्रोत्साहन देणे थांबवावे, असा सल्ला विरोधकांनी दिला आहे.

विरोधकांनी फडणवीस यांना त्यांच्या मंत्रीपदाच्या शपथेतील महत्वाचा भाग आठवण करून दिला आहे, ज्यात त्यांनी सर्व नागरिकांना न्याय्य आणि निर्भयपणे वागणूक देण्याचे वचन दिले आहे, कोणत्याही प्रकारच्या आकस किंवा ममत्वभाव न ठेवता.


Comentários


bottom of page